सर्व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठुरायाच्या दर्शनासाठी प्रतिवर्षी लाखो भाविक पायी वारी करत असतात.सोलापूर महामार्गाने श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने लाखो वारकऱ्यांच्या सोबत जात असते.दरवर्षी लोणी काळभोर कदमवाकवस्ती येथील रात्रीचा मुक्काम उरकून दुपारच्या मुक्कामाला उरुळी कांचन याठिकाणी पालखी थांबत असते परंतु मागील वर्षी काही राजकीय मंडळींनी पालखी गावामध्ये मुक्कामी नेण्यासाठी गोंधळ घातला.खरे तर भावना चांगली होती परंतु मार्ग चुकीचा असल्याने याचे अनेक परिणाम त्याठिकाणी पाहण्यास मिळाले.त्यानंतर आता परतीच्या प्रवासात पालखी मुक्काम कुंजीरवाडी याठिकाणी थांबण्याचे ठरले आणि कुंजीरवाडी ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला.यावेळी
सर्व ग्रामस्थांच्या व पालखी सोहळा प्रमुख यांच्या सहकार्याने संत तुकाराम महाराज पालखी परत येतानाचा मुक्काम कुंजीरवाडी मध्ये निश्चित झाला आहे.
यावेळी पालखी सोहळा अध्यक्ष ह भ प जालिंदर विश्वनाथ मोरे महाराज यांचा व संपूर्ण विश्वस्त महाराजांचा सत्कार कुंजीरवाडी गावचे सरपंच हरेश गोठे, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य सागर निगडे, मा तंटामुक्ती अध्यक्ष बाप्पू घुले, मराठा महासंघ हवेली तालुका कार्याध्यक्ष गजानन जगताप, श्रीराम सोसायटी मा संचालक काळूराम कुंजीर, नवनाथ आंबेकर यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. कुंजीरवाडी गावाला सेवा करण्याची ऐतिहासिक संधी मिळाली याबद्दल गावात आनंद उत्सव साजरा होत आहे.यावेळी सरपंच हरेष गोठे म्हणाले की, माझ्या कार्यकाळात माझ्या गावाला ही संधी मिळाली याचा मला खूप आनंद होत असून आम्ही ग्रामस्थ योग्यप्रकारे सोहळ्याची सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू



















