पुणे
ACT SMART INDIA उपक्रम हा किशोरवयीन विद्यार्थ्यांना संवादात्मक शिक्षणाद्वारे योग्य जीवन कौशल्ये प्राप्त करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेला एक जागतिक उपक्रम आहे.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील दबावांशी सामना करण्यासाठी उपयुक्त कौशल्ये शिकवून लवकर हस्तक्षेप करण्यावर भर देतो. सदर उपक्रम सध्या 25 पेक्षा अधिक देशांमध्ये सुरू आहे आणि जगभरात 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव पाडला आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि नशा मुक्त अभियान यांच्याशी सुसंगत असलेला हा उपक्रम किशोरांना योग्य निर्णय घेण्यासाठी आणि सामाजिक दबावांना तोंड देण्यासाठी सक्षम करतो.
सध्याच्या सामाजिक परिस्थिती मध्ये विध्यार्थ्यांना अल्पवयीन व्यसनधिनाता, समवयस्कांचा दबाव, गुन्हेगारी वृत्ती, लैगिक शिक्षण, वाईट संगत या विषयांचे मूलभूत शिक्षण मिळणे गरजेचे आहे. या कार्यशाळेतून वेगवेगळ्या विषयांवर मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. “सी.एस.आर बॉक्स फॉउंडेशन मार्फत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. संस्थे मार्फत तृप्ती रणधीर कार्यक्रमाचे संचालन केले. या वेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष राव सर उपस्थित होते.
















