प्रा सचिन माथेफोड,पुणे
मौजे थेऊर, कोलवडी–साष्टे, नायगाव, हिंगणगाव परिसरातील शेतकऱ्यांची अत्यंत महत्त्वाची आणि दीर्घकाळ प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. रात्री उपलब्ध होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे वाढत्या बिबट्या वावराचा धोका, तसेच झालेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे शेतकरी मोठ्या भीतीत होते. दिवसा वीजपुरवठा व्हावा, ही त्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर प्रत्यक्षात उतरली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा युवराज काकडे करत होते. स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी MSEB रास्तापेठ कार्यालयात जाऊन, मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बैकर साहेब यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले व तातडीने कार्यवाहीची विनंती केली.
या पाठपुराव्यानंतर MSEB ने तात्काळ निर्णय घेत आजपासून दिवसा शेतीपंपांना वीजपुरवठ्याची अंमलबजावणी केली आहे. आज सकाळीपासूनच वीजपुरवठा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
🔹 शेतकऱ्यांची ऐकून घेतलेली न्याय्य मागणी पूर्ण
🔹 बिबट्या धोक्यापासून मुक्तता – शेतकऱ्यांना दिलासा
🔹 दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युवराज काकडे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा फलदायी
शेतकरी बांधवांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच महत्त्वाचा ठरला आहे.
“सेवेशी ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर”
स्थानिकांच्या समस्यांसाठी तत्पर
















