सचिन माथेफोड,पुणे
थेरूर येथे काल आयोजित करण्यात आलेल्या गाठीमेटी दौऱ्यास ग्रामस्थांचा उत्कृष्ट व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद गट क्रमांक ४०च्या सौ. पल्लवी युवराज हिरामण काकडे तसेच पंचायत समिती गण क्रमांक ७९ चे कु. संग्राम मच्छिंद्रभाऊ कोतवाल यांच्या उपस्थितीत हा दौरा यशस्वीरीत्या पार पडला.
या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न, समस्या व अपेक्षा मांडल्या. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण व इतर मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकप्रतिनिधींनी सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेत तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्याची ही संधी नागरिकांनी मनापासून स्वीकारली असून, या गाठीमेटी दौऱ्यामुळे लोकप्रतिनिधी व जनतेमधील नाते अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
आरोग्यदूत युवराज काकडे तसेच कुंजीरवाडी ग्रामपंचायत सदस्य संग्राम कोतवाल एकत्र आल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला वेगळाच रंग चढलेला आहे.आता प्रत्येक गटात जवळजवळ प्रत्येक गावातील एक उमेदवार असल्याने मतदानाच्या दिवशी मतदारांच्या गळ्यातला ताईत कोण बनेल याचा भल्या भल्याना अंदाज काढता येत नाही.आता फक्त आळंदी म्हातोबा हे गाव उरलेले असून स्थानिक उमेदवार तिथला देखील असल्याने मतदारांची मात्र आता संभ्रमावस्था झालेली पाहण्यास मिळत असल्याने.सर्वच ठिकाणी सर्वच मतदार सध्या विविध कार्यक्रमाला उपस्थित आहे.त्यामुळे उमेदवार आता नवीन काय शक्कल लढवणार आहे याची चर्चा सुरू आहे.
















