प्रा सचिन महाराज माथेफोड,पुणे
फुरसुंगी ❘ नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर फुरसुंगीमध्ये राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. उमेदवार विशाल हरपळे यांच्या एका आक्रमक निवेदनाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे.
“माझ्याकडे कोणतेही पद नव्हते… तरीही मी रस्ते, पाणी, नागरिकांच्या अडचणी यासाठी दररोज काम केलं. आता जनता मला निवडून दिली तर विकासाचा असा धिंगाणा घालीन की पाच वर्षे कुणालाच बोलता येणार नाही,” अशी जोरदार गर्जना त्यांनी केली.
या वक्तव्यानंतर विरोधक मात्र पूर्णपणे बचावात्मक भूमिकेत गेले आहेत. हरपळेंची वाढती लोकप्रियता, तरुणांमधील पकड आणि सोशल मीडियावर मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधकांत चिंतेचे सावट दाटले आहे. अनेक कार्यकर्ते ही हवा बदलत असल्याचे मान्य करीत आहेत.
ग्रामीण भागात हरपळे यांनी केलेल्या पदरमोडीच्या कामांची चर्चा सुरू असून, पदावर असलेल्या काही जणांवर अप्रत्यक्षपणे टीका करत त्यांनी म्हटले—
“पदावर बसलेल्यांनी फक्त आश्वासनांचं ढोल बडवलं… काम मी केलं. लोकांनी एक संधी दिली तर विकासाचा वेगच बदलून टाकेन.”
फुरसुंगीतील तणावपूर्ण वातावरणात हरपळेंच्या या ‘धिंगाणा’ विधानाने निवडणूक अधिक रंगतदार तर झालीच, पण विरोधकांमध्ये मात्र स्पष्टपणे काळजीचा सूर दिसू लागला आहे.



















