प्रा सचिन माथेफोड,पुणे
कुंजीरवाडी आळंदी म्हातोबा दरम्यान रखडलेले रस्त्याचे काम जागृत ग्रामस्थ,पोलिस प्रशासनाची मध्यस्ती तसेच राजकीय पुढाऱ्यांच्या पाठपुराव्याने सुरू झाले आहे.स्थानिक शेतकऱ्यांच्या वादामुळे सदरील काम अनेक दिवस रखडले होते.या रखडलेल्या कामामुळे ग्रामस्थान नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते.परंतु आता ते काम सुरू झाल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.तसेच या रस्त्याच्या कामापूर्वीच नव्या कालव्यावरील पुलाचे काम मंजूर झाले होते.परंतु काही करणानिमीत्ताने त्या कामास दिरंगाई झाली व पुन्हा एकदा त्याची नव्याने निविदा काढण्यात आलेली आहे.आता त्या कामास केव्हा राजकीय मुहूर्त लागेल हे पहाण्याजोगे आहे.तरी आळंदी म्हातोबा येथील राजकीय नेत्यांनी हे काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले आहेत.



















