शिरूरहवेली :
पवित्र अशा जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या ९ वर्षांपासून अखंडपणे सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांची परंपरा यंदाही यथास्थित सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे चहा, पाण्याचे वाटप, गरम खिचडी व पारंपरिक फराळाचे वाटप हे कार्य अत्यंत निष्ठेने व भक्तिभावाने पार पाडले जात आहे.
या सेवाकार्यात मनसेचे शिरूरहवेली उपाध्यक्ष श्री. अनिरुद्ध मराठे, तसेच श्री. मनोज गायकवाड, श्री. संजय जगताप, श्री. रमेश मुर्दुंगे, श्री. गणेश पवार, श्री. राहुल सातपुते, श्री. प्रशांत शितोळे, श्री. भूषण पाटोळे श्री माऊली कुंजीर व त्यांचा सहकारी मित्र परिवार आपला मोलाचा सहभाग देत आहेत.
पायी दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना थंडगार पाणी, गरमागरम खिचडी आणि सकस फराळाचे वाटप करून सेवा देण्याचे हे कार्य समर्पणभाव, सामाजिक बांधिलकी आणि वारकरी संस्कृतीच्या जतनाच्या भावनेतून दरवर्षी राबवले जाते.
वारकऱ्यांनी या सेवाकार्याबद्दल समाधान व्यक्त करत मन:पूर्वक आभार मानले.



















